टाकळीभान येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
शिव वार्ता प्रतिनिधी!बापूसाहेब नवले
श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा समाजाने आदर्श घ्यावा, असे आवाहन केले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोकणे पाटील,उपसरपंच संतोष खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य सुनील भाऊ बोडखे,भाऊसाहेब पवार,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, सोमनाथ शिंदे,दिलीप लोखंडे, विजय साळवे, अमोल अवसरमोल,नारायण काळे, भाऊसाहेब गव्हाणे, मेजर विनोद रणनवरे, तनवीर शेख, शंकर बोरुडे, सुभाष भाऊ बोरुडे, राजू भाऊ साळवे, सागर बोरुडे, आबासाहेब बोरुडे, अजित साळवे, संदीप साळवे, बाळासाहेब साळवे, अक्षय बोरुडे, किरण बोरुडे, गणेश बोरुडे, निखिल बोरुडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.[महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा महत्त्वपूर्ण निर्णय]
यावेळी उपस्थितांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि मानवतावादी विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.












